Slide 1 Slide 2 Slide 3 Slide 4 Slide 5 Slide 6
Showing posts with label Aniruddha. Show all posts

Vaishakh Pournima Importance

 


वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सत्य, प्रेम आणि आनंद ह्या पवित्र त्रिसुत्रींशी एकरुप झालेले महासिद्धपुरुष विशाल मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र येतात व सत्प्रवृतीच्या उत्थापनाची योजना आखतात. अशा ह्या वैशाख पौर्णिमेस तीन महत्वाची प्रमाणे आहे. 

१) वैशाख पौर्णिमा ही प्रबौद्ध पौर्णिमा आहे. 

२) वैशाख पौर्णिमेचा दिवस पृथ्वीपती विनायकाचा जन्म दिवस मनाला जातो. 

३) वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान वेदव्यास सर्व पृथ्वीची एक प्रदक्षिणा चौवीस तासात पूर्ण करतात; असे मानले जाते.कारण भगवान वेदव्यास त्यादिवशी सुर्याच्याच रथात बसून फिरत असतात. 

श्रद्धावानांनो वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिनी उपासनाः 

वैशाख पौर्णिमेच्या ह्या पवित्रदिनी ब्राह्ममुहूर्तावर किंवा त्यानंतरच्या वेळेत उपासना करणाऱ्या व्यक्तीस सिद्धीभूमित जमणाऱ्या सर्व सिद्धपुरुषांचे आशीर्वाद प्राप्त होतात. 

अशा ह्या वैशाख पौर्णिमेचे महत्व जाणून आपण सहजसिद्ध श्री. अनिरुद्धांना प्रार्थना करूया, 

" हे गुरुराया अनिरुद्धा, तू सामर्थ्याचा,ऐश्वर्यचा, प्रेमाचा,क्षमेचा व शौर्याचा अक्षय साठा आहेस. तू अनंत आहेस म्हणून तुच आम्हा सर्वांचा आधार व तारणहारही आहेस. सर्वांचा आधार म्हणून आदिमाता चंडीकेचे आशीर्वाद तुला नित्य प्राप्त आहेच. म्हणून आम्ही तुझे भक्तप्रिय आदिमाता चंडीकेच्या चरणी प्रार्थना करतो की,हे आदिमाते माझ्या सदगुरूंना श्री. अनिरुद्धांना तू सदैव विजयी कर!" 

|| अनिरुद्ध सदा विजयते ||

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वैशाख पौर्णिमा उपासना 

१. प्रथम एक चौरंग किंवा पाट घेवून त्यावर शाल घालावी नंतर त्यावर आपल्या सद्‌गुरूंचा व हनुमंताचा फोटो ठेवावा. 

२. श्री सदगुरुंच्या प्रतिमेस सुगंधित किंवा प्राप्त फुलांचा हार घालावा व श्री हनुमंताच्या प्रतिमेस रुईच्या पानांचा हारघालावा. 

३. दीप व अगरबत्ती लावून हाथ जोडावे व श्री सदगुरूंचे तसेच श्री हनुमंताचे ध्यान करावे. 

४. त्यानंतर ११ वेळा श्री अनिरुद्ध कवच किंवा ११ वेळा श्री हनुमान चालीसा किंवा ११ वेळा हनुमान स्तोत्र किंवा ११ वेळा श्री साईबाबांची ११ वचने किंवा ११ वेळा श्री अनिरुद्धांची ९ वचने किंवा ११ वेळा आदिमाता शुभनकरा स्तवन व ११ वेळा अशुभनाशिनी स्तोत्र म्हणावे. 

५. त्यानंतर - 

    १) आंब्याच पन्ह 

    २) कच्च्या आंबा व भिजलेली चण्याची डाळ वाटून त्याचा प्रसाद अर्पण करावा व त्यानंतर लोटांगण घालावे. ब्रम्हमुहूर्तावर उपासना करणे शक्य न झाल्यास दिवसभरात कधीही करणे. 

जो कोणी प्रेमाने वैशाख पौर्णिमेला हि उपासना करेल त्याच्या घरी ह्या दिवशी सद्‌गुरू हनुमंताबरोबर येवून जातोच. अशीग्वाही सदगुरु श्री आनिरुद्धानी दिली आहे.

Read more »

Trivikram Jal

अभिमंत्रित त्रिविक्रम जल 


jal

 ह्या अभिमंत्रित जलापासून कोणीही वंचित राहणार नाही. आपण प्रथम ह्याचे नियम जाणून घेऊ या. नियम म्हणजे त्रिविक्रमाचे प्रेम आणि आदिमातेची कृपा, प्रेम व क्षमा.

हे अभिमंत्रित त्रिविक्रम जल स्नान करण्यासाठी आहे. स्नान करतान दोन थेंब पाण्यात (बादलीत) टाकायचेत की मग सगळ पाणी चार्ज होणार. जे कोणी शॉवरने आंघोळ घेत असतील त्यांनी, स्टील/पितळ ह्यापैकी कुठल्याही धातूच्या तांब्या घ्यायचा त्याच्यात पाणी घेऊन दोन थेंब ह्या जलाचे टाकायचेत मग टाळू, चेहरा, कंठकूपचक्र (विशुद्धचक्र), मस्तक (आज्ञाचक्र) कपाळावर मध्यभागी ह्या भागांना ते पाणी लावायचं.

हे पाणी मंगळवारपासून वापरायला सुरुवात करायची आहे. जेव्हा हे जल वापरणार त्यादिवशी त्या बाटलीतले सगळे पाणी संपवायचे, दुसर्‍या दिवशीसाठी पुन्हा त्यात पिण्याचे पाणी बाटलीत (३०ml ची बाटली) भरायचे. बादलीत दोनपेक्षा जास्त थेंबही टाकू शकता.

तुम्हाला इतर कोणाला हे जल द्यायचे असेल तर, त्यांच्या बादलीत दोन थेंब टाका आणि बाटली परत घेऊन या. कारण ती बाटली अभिमंत्रित गुहा तयार होणार आहे. ही गुहा रोज भरायची, रोज संपवायची. ही बाटली फक्त एका वर्षापर्यंतच चार्ज राहील.

एक वर्षानंतर गुरुक्षेत्रम्‌मध्ये बाटली चार्ज करून घेण्यासाठी आणायची. गुरुक्षेत्रम्‌मध्ये येऊन एकदा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा .मग अकरा वेळा ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रंम्‌ । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ हा मंत्र म्हणायचा पुन्हा एकदा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा.

जे इथे नाहीत त्यांच्यासाठी मी इथे एक बाटली चार्ज करून ती गुरुक्षेत्रम्‌मध्ये ठेवणार आहे. समजा तुम्ही चार्ज केलेली बाटली चुकून फुटली तर, नवीन बाटली घ्यायची एकदा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा की ती बाटली आपोआप चार्ज होईल.

जल विकायचा प्रयत्न केला तर त्याची power जाणार. पाण्यात कसलाही व्यवहार चालणार नाही. त्रिविक्रमने तुम्हाला जल विकलेलं नाहिए. जल विकलंत तर, जल विकणारा आणि विकत घेणारा दोघांसाठी ही ह्या पवित्र जलाचा उपयोग ह्या जन्मासाठी संपलेला असेल. ज्यांची इच्छा नाही त्यांना हे जल देऊ नका. ज्यांचा भाव आहे त्यांनाच द्या.

समजा एक वर्षानंतर गुरुक्षेत्रम्‌ला यायला नाही मिळाले तर, एक महिना उशीर झाला तर ११ ऐवजी २२ वेळा ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम्‌ । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ मंत्र म्हणायचा.

कुठलीही गोष्ट ह्या बाटलीला बाधित करू शकणार नाही. स्त्रियांना मासिक पाळी असतानाही ह्या जलाने आंघोळ केली तरी चालेल. सुतक आहे, सोयर आहे काहीही problem नाही.

समजा उंदीर मुतला बाटलीवर. शांतपणे बाटली धुवायची सद्गुरूंचं नाव घ्यायचं पाणी पुन्हा अभिमंत्रीत होणार. त्याच्यासाठी सगळी बाळचं आहेत. चुकून कितीही मोठी चूक केली तर सांभाळायला मी समर्थ आहे तो बाप आहे, सख्खा बाप आहे.

ह्या मंत्रात जे दिलयं ते सगळं जल करणार.

 बेसिकली आमची १) रोगप्रतिबंधक शक्ती वाढवणार, २) मन:शक्ती वाढवणार ३) जीवन उत्सहाने जगण्यासाठी प्राण आवश्यक आहे. प्राणाला कार्य करण्याची प्रेरणा देणार. प्राणाला, मनाला रोगप्रतिबंधक शक्ती पुरवणार आहे.

आंघोळ करताना ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम्‌ । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ ह्या मंत्राबरोबर ‘ॐ ग्लौं सद्‌गुरुनाथाय नम:’ म्हटलं तर अधिक चांगलं.
हातून कधी चूक घडली तर, शांतपणे पाण्यात दोन थेंब हे जल घाला, आणि सद्‌गुरुचं नाव घेत आंघोळ करा, तिथल्या तिथे सगळं नाहीस होईल.

हे जल नीट जतन केले तर पिढ्यान्‌पिढ्या तुम्ही हे जल पुढे देणार आहात.

माझ्या सध्याच्या उपासनेची प्रथम निष्पत्ती हे जल आहे. आज अभिमंत्रित केलेली ही बाटली अडीच हजार वर्षे गुरुक्षेत्रम्‌मध्ये असणार आहे.
 संदर्भ : परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०६.०३.२०१४)

॥ हरि ॐ॥
For More Details Visit : http://www.manasamarthyadata.com/thursday_excerpts.php?id=100&lang=4

Read more »