#htmlcaption1

Shree Rannchandika Prapatti



'Shree Rannchandika Prapatti',  Although fully spiritual in itself, this will make of every man and every woman, a valiant soldier, a valiant human being and also valiant spiritually.

This may be offered on any Monday of the month of Shravan. 
Just the one day (Sankranti) for women and a choice of four or even five Mondays for the men! Why is that? That is because not only the energy centers of women but also their capacity to receive and absorb differ considerably from those of men. Besides, this is how Nature has made them both. The difference moreover, is to be traced to the hormones that are specific to the gender. The day of the Sankranti for the women and any Monday of the month of Shravan for the men, is an arrangement made in consideration of this difference and not meant to give any special facility to the men.

Do you know who is worshipped on the Monday of the month of Shravan? The Shivshankar for one, yes sure. Who else? Do you remember the other picture that we include in the poojan. How many of you do all this in the first place? Whose pictures are these? Jivatya and Narsinha. The poojan on the Monday of the Shravan is addressed to Narsinha. The Narsinha form is half lion and half man. Every man must have the firm belief that the Narsinha is indeed the Trivikram and the Trivikram is the Narsinha, they are one and the same. The men offer their prapatti after sunset but individually and separately whereas the women do it in Open Space after sunset of course but as a group, collectively. The open space enhances the capacity of the women to receive and absorb whereas in case of men, it is enclosed space that enhances their capacity to receive and absorb. Besides, their capacities of energy acceptance too differ from each other and so the men have to be at home (enclosed space) and the women will offer their Prapatti on outdoors - in the open space.
Read more...
Read more »

Meaning of word "Ambadnya"


अंबज्ञता म्हणजे आदिमातेविषयी श्रद्धावानाच्या मनात असणारी व कधीही  न ढळू  शकणारी असीम कृतज्ञता.  (Ref – Matruvatsalya Upanishad)
Ambadnya means the feeling of a Shraddhavan of firm and constant gratitude towards Mothi Aai (Aadimata) in all conditions.
जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा अंबज्ञ म्हणा, त्याच क्षणाला तुमचं एकटेपण संपलेलं असेल- अनिरुद्ध बापू. 
Click to Read More..
Read more »

SHGG Announcements





  • Please note, there will be no Upasana, Satsang and P.P.Bapu's both Pravachans on
1) Thursday 02/10/14
2) Thursday 23/10/14

 3) Also note,
Shree Aniruddha Chalisa Pathan will be on Sunday 12/10/14 at Shree Harigurugram from 9.00am to 9.00pm followed by Aarti. 
All shraddhavans can participate in this Pathan

4) Friday 03/10/14, 
DASSERA VIJAYUPASANA
will be as usual at Shree Harigurugram at 7.00 pm.
------------------------------------------------------------------------------------------------------------
  • गुरुवार 28 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर 2014 रोजी श्रीहरिगुरुग्राम, वांद्रे, मुंबई येथे उपासना व सदगुरुंचे प्रवचन होणार नाही ह्याची सर्वानी नोंद घ्यावी.
- केंद्रीय केंद्र संपर्क समिती
------------------------------------------------------------------------------------------------------------
|| हरि ॐ ||
  • आज गुरुवार दिनांक ३१ जुलै २०१४ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे उपासना, परमपूज्य बापूंचे प्रवचन व सत्संग होणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी व ही सुचना कार्यकारिणी सेवक, कार्यकर्ता सेवक व श्रद्धावानांपर्यंत लवकरात लवकर पोहचवावी.
-केंद्रीय केंद्र संपर्क समिती

-----------------------------------------------------------------------------------------------------------

  • On coming thursday i.e. on 17-July-2014 there will be no Nitya Upasana, discourse or any other activity at Shri Harigurugram. All shraddhavan and karyakarta sevak to take note of this. 
Ambadnya!  
-Samirsinh Dattopadhye
Read more »

सप्तमातृका पूजन


गुरुवार, दि. २४ ऒक्टोबर २०१३ रोजी परमपूज्य बापूंनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर प्रवचन केले. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या बाळाचं जीवन निरोगी असावं आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं. ह्या दृष्टीकोनातून पूर्वापार परंपरेनुसार घरात बाळ जन्माला आल्यानंतर षष्ठी पूजन केलं जातं. मात्र काळाच्या ओघात चुकीच्या रूढी जोपासल्या गेल्या कारणाने ह्या पूजनाचे महत्त्व फक्त कर्मकांडापुरते मर्यादित राहिले. ह्या पूजनाचा उद्देश, त्याचे महत्व आणि मूळ पूजनपद्धती ह्याबद्दल परमपूज्य बापूंनी प्रवचनातून मार्गदर्शन केले.

परमपूज्य बापू म्हणाले, “ब्रह्मर्षींमध्ये पहिल्यांदा आई झालेल्या लोपामुद्रा (अगस्त्य ऋषींची पत्नी) आणि अरुंधती (वसिष्ठ ऋषींची पत्नी) हया एकाच वेळेस प्रसूत झाल्या. अगस्त्य-लोपामुद्रा व वसिष्ठ-अरुंधती, ह्या चौघांनी आपापल्या बाळांचे जे पहिलं पूजन केले त्याला ’सप्तषष्ठी पूजन’ म्हणून संबोधण्यात आले.

मातृवात्सल्यविंदानम् मध्ये आपण वाचतो की शुंभ-निशुंभ ह्या राक्षसांशी लढण्याची वेळ आल्यावर महासरस्वतीच्या मदतीसाठी सगळे देव आपापल्या शक्ती पाठवतात. त्या सात शक्ती म्हणजेच सप्तमातृका व त्यांची सेनापती आहे काली. त्या सात मातृकांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
१) माहेश्वरी – जी पंचमुखी आहे आणि वृषभावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात त्रिशूळ आहे.
२) वैष्णवी – जी गरुडावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात चक्र, गदा आणि पद्म आहे.
३) ब्रह्माणी – जी चार मुख असलेली आहे आणि हंसावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात कमंडलू व अक्षमाला आहे.
४) ऐन्द्री – जी इंद्राची शक्ती आहे आणि ऐरावतावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात वज्र आहे.
५) कौमारी – जी सहा मुख असलेली आहे आणि मोरावर आरूढ झालेली आहे.
६) नारसिंही – जिचे मुख सिंहीणीचे आहे. तिच्या हातात गदा व खडग् आहे.
७) वाराही – जिचे मुख वराहाचे आहे व जी पांढऱ्या रंगाच्या रेड्यावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात चक्र, खडग्, तलवार व ढाल आहे.”
Read more »

Guru Pournima Utsav 2014

गुरुपौर्णिमा उत्सव २०१४



गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।गुरुरेव्‌ परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: ॥

भक्ती व सेवेची सांगड घालून संसार व परमार्थ एकाच वेळेस आनंदाने करण्यासाठी, स्वत:चा समग्र विकास साधण्यासाठी मानवाला ओजाची, गुरुतेजाची गरज असते आणि सद्‌गुरुतत्वाकडूनच हे गुरुतेज प्रत्येकाला प्राप्त होते.

गुरुपौर्णिमेस सद्‌गुरुंच्या ऋणांचे स्मरण करुन दर्शन घेतल्यामुळे भक्त अधिकाधिक गुरुतेज सहजतेने प्राप्त करु शकतो. गुरुतेज स्वीकारण्यात येणारे अवरोध गुरुपौर्णिमेच्या शुभपर्वणीस आपोआप गळून पडतात व गुरुतेजाचा अनिरुध्द प्रवाह प्रवाहित होतो, अशी गुरुपौर्णिमेची महती आहे.

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुध्दा आपल्या संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेचा उत्सव शनिवार दि. १२ जुलै २०१४ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत श्री हरिगुरुग्राम, वांद्रे (पूर्व), मुंबई ह्या ठिकाणी साजरा केला जाईल.

दरवर्षीप्रमाणे या गुरुपौर्णिमेलाही श्रध्दावानांना खालील गोष्टींचा लाभ घेता येईल.

१. परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुध्द बापू, नंदाई व सुचितदादा श्रीनृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे पूजन सकाळी करतील व त्यानंतर ह्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ सर्व श्रध्दावानांना मिळेल.

२. परमपूज्य बापूंच्या मुळ सद्‌गुरुंच्या पादुका, पुर्वावधूत कुंभ व अपूर्वावधूत कुंभ म्हणजेच पहिला व २४ वा अवधूत कुंभ यांच्या प्रदक्षिणेचा लाभ सर्वांना घेता येईल.

३. श्रीत्रिविक्रम पूजनाचा लाभ सर्व इच्छूक श्रध्दावान घेऊ शकतील.

४. दिंडीमधून फिरणार्‍या पालखीमध्ये परम पूज्य सद्‌गुरु बापूंच्या पदचिन्हांवर प्रत्येक श्रध्दावानास मस्तक ठेवण्यास मिळेल.

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुध्दा गुरुपौर्णिमेच्या ह्या पावन दिवशी परमपूज्य बापूंचे दर्शन भक्तांना रात्री ९.०० वाजेपर्यंत घेता येईल. परमपूज्य बापू भक्तांकडून कधीच कुठल्याही प्रकारची गुरुदक्षिणा, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड, फळे, फुले, हार मिठाई, पैसे इत्यादि स्वीकारत नाहीत, ह्याची भक्तांनी कृपया नोंद घ्यावी.


Read more »

Trivikram Poojan Importance

Read more »

Mangal Graha Badha

Read more »

Trivikram Jal

अभिमंत्रित त्रिविक्रम जल 



 ह्या अभिमंत्रित जलापासून कोणीही वंचित राहणार नाही. आपण प्रथम ह्याचे नियम जाणून घेऊ या. नियम म्हणजे त्रिविक्रमाचे प्रेम आणि आदिमातेची कृपा, प्रेम व क्षमा.

हे अभिमंत्रित त्रिविक्रम जल स्नान करण्यासाठी आहे. स्नान करतान दोन थेंब पाण्यात (बादलीत) टाकायचेत की मग सगळ पाणी चार्ज होणार. जे कोणी शॉवरने आंघोळ घेत असतील त्यांनी, स्टील/पितळ ह्यापैकी कुठल्याही धातूच्या तांब्या घ्यायचा त्याच्यात पाणी घेऊन दोन थेंब ह्या जलाचे टाकायचेत मग टाळू, चेहरा, कंठकूपचक्र (विशुद्धचक्र), मस्तक (आज्ञाचक्र) कपाळावर मध्यभागी ह्या भागांना ते पाणी लावायचं.

हे पाणी मंगळवारपासून वापरायला सुरुवात करायची आहे. जेव्हा हे जल वापरणार त्यादिवशी त्या बाटलीतले सगळे पाणी संपवायचे, दुसर्‍या दिवशीसाठी पुन्हा त्यात पिण्याचे पाणी बाटलीत (३०ml ची बाटली) भरायचे. बादलीत दोनपेक्षा जास्त थेंबही टाकू शकता.

तुम्हाला इतर कोणाला हे जल द्यायचे असेल तर, त्यांच्या बादलीत दोन थेंब टाका आणि बाटली परत घेऊन या. कारण ती बाटली अभिमंत्रित गुहा तयार होणार आहे. ही गुहा रोज भरायची, रोज संपवायची. ही बाटली फक्त एका वर्षापर्यंतच चार्ज राहील.

एक वर्षानंतर गुरुक्षेत्रम्‌मध्ये बाटली चार्ज करून घेण्यासाठी आणायची. गुरुक्षेत्रम्‌मध्ये येऊन एकदा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा .मग अकरा वेळा ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रंम्‌ । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ हा मंत्र म्हणायचा पुन्हा एकदा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा.

जे इथे नाहीत त्यांच्यासाठी मी इथे एक बाटली चार्ज करून ती गुरुक्षेत्रम्‌मध्ये ठेवणार आहे. समजा तुम्ही चार्ज केलेली बाटली चुकून फुटली तर, नवीन बाटली घ्यायची एकदा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा की ती बाटली आपोआप चार्ज होईल.

जल विकायचा प्रयत्न केला तर त्याची power जाणार. पाण्यात कसलाही व्यवहार चालणार नाही. त्रिविक्रमने तुम्हाला जल विकलेलं नाहिए. जल विकलंत तर, जल विकणारा आणि विकत घेणारा दोघांसाठी ही ह्या पवित्र जलाचा उपयोग ह्या जन्मासाठी संपलेला असेल. ज्यांची इच्छा नाही त्यांना हे जल देऊ नका. ज्यांचा भाव आहे त्यांनाच द्या.

समजा एक वर्षानंतर गुरुक्षेत्रम्‌ला यायला नाही मिळाले तर, एक महिना उशीर झाला तर ११ ऐवजी २२ वेळा ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम्‌ । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ मंत्र म्हणायचा.

कुठलीही गोष्ट ह्या बाटलीला बाधित करू शकणार नाही. स्त्रियांना मासिक पाळी असतानाही ह्या जलाने आंघोळ केली तरी चालेल. सुतक आहे, सोयर आहे काहीही problem नाही.

समजा उंदीर मुतला बाटलीवर. शांतपणे बाटली धुवायची सद्गुरूंचं नाव घ्यायचं पाणी पुन्हा अभिमंत्रीत होणार. त्याच्यासाठी सगळी बाळचं आहेत. चुकून कितीही मोठी चूक केली तर सांभाळायला मी समर्थ आहे तो बाप आहे, सख्खा बाप आहे.

ह्या मंत्रात जे दिलयं ते सगळं जल करणार.

 बेसिकली आमची १) रोगप्रतिबंधक शक्ती वाढवणार, २) मन:शक्ती वाढवणार ३) जीवन उत्सहाने जगण्यासाठी प्राण आवश्यक आहे. प्राणाला कार्य करण्याची प्रेरणा देणार. प्राणाला, मनाला रोगप्रतिबंधक शक्ती पुरवणार आहे.

आंघोळ करताना ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम्‌ । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ ह्या मंत्राबरोबर ‘ॐ ग्लौं सद्‌गुरुनाथाय नम:’ म्हटलं तर अधिक चांगलं.
हातून कधी चूक घडली तर, शांतपणे पाण्यात दोन थेंब हे जल घाला, आणि सद्‌गुरुचं नाव घेत आंघोळ करा, तिथल्या तिथे सगळं नाहीस होईल.

हे जल नीट जतन केले तर पिढ्यान्‌पिढ्या तुम्ही हे जल पुढे देणार आहात.

माझ्या सध्याच्या उपासनेची प्रथम निष्पत्ती हे जल आहे. आज अभिमंत्रित केलेली ही बाटली अडीच हजार वर्षे गुरुक्षेत्रम्‌मध्ये असणार आहे.
 संदर्भ : परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०६.०३.२०१४)

॥ हरि ॐ॥
For More Details Visit : http://www.manasamarthyadata.com/thursday_excerpts.php?id=100&lang=4

Read more »